शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या आहारात भाताचा समावेश करणं ठरू शकतं डायबिटीस, हृदयरोगाचं कारण; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 11:43 IST

रोज भात जास्त प्रमाणात खाल्यानं तुम्ही जीवघेण्या आजारांना निमंत्रण देऊ शकता.

भारतात गव्हानंतर सगळ्यात जास्त वापर तांदळांचा केला जातो.  वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी भाताचा वापर केला जातो.  रोजच्या  जेवणात डाळ भात, मसालेभात, बिर्यानी, खीर, पुलाव किंवा इतर पदार्थांमध्ये तांदळाचा वापर सर्वाधिक केला जातो. भात खाल्याशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही. रोजच्या जीवनाचा भाग म्हणून आहारात तांदळाचा समावेश केला जातो.  पुर्वीच्या काळी रोज भात खाण्याची सवय असणं हे ठिक होतं. सध्याची जीवनशैली पाहता  रोज भात जास्त प्रमाणात खाल्यानं तुम्ही जीवघेण्या आजारांना निमंत्रण देऊ शकता. भात खाल्यानं शरीरातील अवयवांवर कसा परिणाम होतो. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

भात आपल्या रोजच्या जीवनाच भाग आहे. आरोग्याला भाताच्या सेवनानं अनेक फायदे होत असेल तरी जास्त प्रमाणात खाणं शरीरारासाठी नुकसानकारक ठरू शकतं. देशभरात डायबिटिस आणि  हृदयविकारांच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. हृदयविकाराचे  आणि डायबिटिसच्या रुग्णांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. 

तांदळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शारीरिक स्वरुपात एक्टिव्ह राहता येत नाही. शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. पूर्वीच्याकाळी वाहतुकीची साधनं नसल्यामुळे लोक  कित्येक किलोमीटर पायी चालत जायचे. सध्या तुलनेने हालचाल फारशी होत नाही. त्यामुळे हृदयाचे आजार, कॉलेस्ट्रॉल वाढणं अशा समस्या उद्भवण्याचा शक्यता असते.

मॅनचेस्टर आणि सलफोर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी आपल्या संशोधनात दिलेल्या माहितीनुसार ज्या जागेवर शेतकरी भाताची शेत करतात त्या शेतीत आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते. पूरस्थिती उद्भवल्यास आर्सेनिकचं प्रमाण वाढतं. आर्सेनिकमुळे इतर टॉक्सिन्ससोबत शरीरात  कार्डीओवॅस्क्यूलर आजार पसण्याचा धोका वाढतो.  रोज भात खात असलेल्या लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढते.  अशात  धुम्रपान केल्यानं हद्यरोग होण्याची संभावना जास्त असते. त्यासाठी  भाताचं सेवन करत असताना प्रमाणात करणं शरीराला चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

शिळा भात खात असाल तर जाणून घ्या नुकसान आणि फायदे

फर्मेंटेड प्रक्रिया शॉर्ट चेन फॅटी एसिड्स निर्माण करातात. त्यामुळे शरीरातील  दोन हार्मोन्स सक्रिय असतात, ग्लूकागन आणि पेप्टईट  जो तुमच्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो,  पोटावरची चरबी कमी करण्यासाठी लठ्ठपणाविरोधक असलेल्या हार्मोन्सचे काम केले जाते, आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा फायदेशीर असते, कॉलेस्टॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी शिळ्या भाताचे सेवन फायदेशीर ठरत असते.

शिळा आणि पुन्हा गरम केल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पोटदुखी, उलटी होणे,  जुलाब होणे, अपचनाचा त्रास अशा समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.  बेसिलस सेरेस हे सर्वसाधारणपणे मातीत तयार होणारा एक विषाणू आहे जो भातासुद्धा काहीवेळा तयार होत असतो. जो कच्च्या आणि शिळ्या भाताला दुषित करत असतो.  शिळ्या भाताचे सेवन वारंवार केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्याचा धोका असतो. हा त्रास लहानांनाच नाही तर महिलांना आणि पुरूषांना  सुद्धा होत असतो.

हे पण वाचा-

कोरोनानंतर आता दुसऱ्या महामारीसाठी सज्ज राहावं; WHO चा जगातील देशांना इशारा

रोज बडीशोप घातलेलं दूध प्याल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं विसराल

डास चावल्यानंतर खाज का येते? कोणत्याही ऋतूत 'या' ७ उपायांनी करा डासांपासून बचाव

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य